एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
कोरोना काळामुळे मागील जवळपास पूर्ण वर्ष भाविकांविना सुन्यासुन्या झालेल्या शिर्डीच्या साईसमाधी मंदिरात आता भाविकांची मांदियाळी जमू लागली आहे व त्याचा परिणाम साई संस्थानच्या उत्पन्न वाढीला वेग येण्यात होऊ लागला आहे. हे मंदिर उघडल्यापासून सव्वा दोन महिन्यातच तब्बल ३२ कोटी रुपयांचे दान साई समाधी मंदिराच्या दानपेटीत पडले आहे.
राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्रीसाईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी १६ नोव्हेंबरला खुले करण्यात आले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ७१ दिवसात १२ लाख २ हजार १६२ साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला आहे. या काळात साईभक्तांकडून तब्बल ३२ कोटी २ हजार १९१ रुपये दानपेटी-देणगी रोख स्वरूपात संस्थानला मिळाली आहे. याशिवाय ७९६ ग्रॅम सोने व १२ हजार १९२ ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरुपात प्राप्त झाली आहे. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी राज्य सरकारने ही धार्मिक स्थळे उघडण्यास १६ नोव्हेंबरला परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीच्या साई मंदिरात म्हणजेच गेल्या ७१ दिवसात १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर १० लाख ४५ हजार भाविकांनी साई प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला आहे. साई संस्थानच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या भक्तनिवास सुविधेचा गेल्या ७१ दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास ३ लाख २० हजार ६३९ भाविकांनी लाभ घेतला आहे. याशिवाय साई संस्थानच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना जी उदी देण्यात येते, ती उदी तब्बल १० लाख ३१ हजार साईभक्तांना दिली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
ऑनलाईन न्यूज
कोरोना काळामुळे मागील जवळपास पूर्ण वर्ष भाविकांविना सुन्यासुन्या झालेल्या शिर्डीच्या साईसमाधी मंदिरात आता भाविकांची मांदियाळी जमू लागली आहे व त्याचा परिणाम साई संस्थानच्या उत्पन्न वाढीला वेग येण्यात होऊ लागला आहे. हे मंदिर उघडल्यापासून सव्वा दोन महिन्यातच तब्बल ३२ कोटी रुपयांचे दान साई समाधी मंदिराच्या दानपेटीत पडले आहे.
राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्रीसाईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी १६ नोव्हेंबरला खुले करण्यात आले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ७१ दिवसात १२ लाख २ हजार १६२ साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला आहे. या काळात साईभक्तांकडून तब्बल ३२ कोटी २ हजार १९१ रुपये दानपेटी-देणगी रोख स्वरूपात संस्थानला मिळाली आहे. याशिवाय ७९६ ग्रॅम सोने व १२ हजार १९२ ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरुपात प्राप्त झाली आहे. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी राज्य सरकारने ही धार्मिक स्थळे उघडण्यास १६ नोव्हेंबरला परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीच्या साई मंदिरात म्हणजेच गेल्या ७१ दिवसात १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर १० लाख ४५ हजार भाविकांनी साई प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला आहे. साई संस्थानच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या भक्तनिवास सुविधेचा गेल्या ७१ दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास ३ लाख २० हजार ६३९ भाविकांनी लाभ घेतला आहे. याशिवाय साई संस्थानच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना जी उदी देण्यात येते, ती उदी तब्बल १० लाख ३१ हजार साईभक्तांना दिली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment